01 जानेवारी 2025 बुधवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2025
💠 वार - बुधवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्षानिमित्त फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा ......!


Link - नवीन वर्ष सुखाचे जावो
•• ┈┉┅━ ◆❍❀🔘❀❍◆ ━┅┉┈••
🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷

•• ┈┉┅━ ◆❍❀🔘❀❍◆ ━┅┉┈••
🌷🌐 .  *
*_💐💐नूतन वर्षाभिनंदन_*💐💐
  🌼 *_ या वर्षातील पहिला  दिवस आहे_*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••     
   🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼
•••••••••••••••••••••••••••••••••
*२०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.*
*१९३२: डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.*
*१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.*
*१९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.*
*१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.*
*१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.*
*१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना*
*१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.*
*१८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.*
*१८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.*
*१८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.*
*१८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.*
*१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.*

  🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼
••••••••••••••••••••••••••••••••••••••
*१९९१: गोपाळ ऋषीदास इंगळे -- कवी*
*१९९१: प्रणव अविनाश कुलकर्णी -- अनुवादक, संपादक*
*१९९०: नागू वीरकर -- लेखक*
*१९८९: गणेश प्रल्हादराव आघाव -- कवी, लेखक*
*१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी*
*१९८१: अशोक गायकवाड ---  कवी*
*१९८१: प्रदीप गुलाबराव ईक्कर -- कवी, लेखक*
*१९७७: राम वाल्मीक राव सोळंके -- कवी*
*१९७६: वि. दा. पिंगळे -- प्रसिद्ध कवी, लेखक*
*१९७६: शेख बिस्मिल्ला शेख कासिम -- कवी*
*१९७५: सोनाली बेंद्रे --  भारतीय अभिनेत्री*
*१९७४: आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी, गायक*
*१९७४: विजय दिगंबर जाधव -- लेखक*
*१९७४: डॉ. अरविंद बाबाराव पाटील -- कवी*
*१९७३: प्रा. युवराज तानाजीराव खरात -- कवी, कथाकार, कादंबरीकार*
*१९७२: भारत मारोतराव दाढेल  -- लेखक*
*१९७१: सीमा गजानन भसारकर -- कवयित्री*
*१९७०: हरिश्चंद्र रामचंद्र धीवार -- कवी*
*१९७०: शेषराव पिराजी धांडे -- प्रसिद्ध कवी*
*१९७०: प्रा.डॉ.सुनील रामटेके --- कवी, लेखक*
*१९६९: हरिबा रानबा अडसुळे -- मराठी व हिंदी मध्ये लेखन करणारे कवी तथा लेखक*
*१९६९: डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक, संपादक*
*१९६८: प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे -- प्रसिद्ध लेखक*
*१९६८: राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव) -- कवी*
*१९६७: मनोज बोरगावकर -- लेखक*
*१९६६: प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार -- प्रसिद्ध लेखक*
*१९६३: आत्माराम शंकरराव कुटे -- कवी*
*१९६२: संजय आर्वीकर - प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक*
*१९६०: अनुरत्न  वाघमारे -- प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक*
*१९६०: प्रा. डॉ. तानाजी राऊ पाटील --  प्रसिद्ध लेखक, कवी*
*१९६०: डॉ. सुरेश गोविंदराव सावंत -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित*
*१९५९: नंदन नांगरे -- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षण संचालक*
*१९५९: गंगासानी रामा रेड्डी --   तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते (मृत्यू: १४ एप्रिल २०११)*
*१९५६: काकासाहेब पांडुरंग देशमुख -- कवी*
*१९५५: शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील -- शाहीर, लेखक*
*१९५५: दयानंद नारायण पिसोळकर -- लेखक*
*१९५३: उद्धव हरिभाऊ कोळपे-जाधव --  लेखक*
*१९५२: डॉ. देवकर्ण तुलशीराम मदन -- प्रसिद्ध लेखक कवी*
*१९५२: यशवंत राजाराम निकम -- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी*
*१९५१: नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता*
*१९५१: शंकर गोविंदराव पांडे -- लेखक (मृत्यू: ९ डिसेंबर २०२४)*
*१९५२: शाजी नीलकांतन करुण -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर*
*१९५०: तुकाराम सीताराम ढिकले -- कवी*
*१९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका*
*१९५०: निर्मला उद्धव भयवाळ -- कवयित्री*
*१९५०: राहत इंदोरी-राहत कुरेशी -- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी (मृत्यू: ११ऑगस्ट २०२०)*
*१९४८: नानासाहेब चिमणराव बोरस्ते -- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार*
*१९४८: नामदेव चंद्रभान कांबळे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, पत्रकार, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित*
*१९४६:जगन्नाथ सोनू अहिरे -- कवी*
*१९४६: डॉ.निवास पांडुरंग पाटील -- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक, लेखक*
*१९४५: प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ -- सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा पटकथा आणि संवाद लेखक*
*१९४५: मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार*
*१९४५: त्रिंबकराव दगडू बरकले -- प्रसिद्ध कवी*
*१९४३: संजीवनी खेर -- प्रसिद्ध लेखिका, पत्रकार*
*१९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण*
*१९४३: प्रा. डॉ. मधुकर रूपराव वाकोडे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक*
*१९४२: उत्तम बंडू तुपे ---  प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल २०२० )*
*१९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार*
*१९३६: राजा राजवाडे – प्रसिद्ध साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७ )*
*१९३५: मोहन चोटी --   भारतीय विनोदी अभिनेता (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९२ )*
*१९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८ )*
*१९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३ )*
*१९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२ )*
*१९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१ )*
*१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )*
*१८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४ )*
*१८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२ )*
*१८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७० )*
*१८७८: हसरत मोहानी --  थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू: १३ मे १९५१ )*

  🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼
••••••••••••••••••••••••••••••••••••••
*२०२३: सुधीर नांदगावकर -- ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक (जन्म: ११ जून १९३९ )*
*२००९: रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )*
*१९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार*
*१९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.(जन्म: ८  ऑक्टोबर १८९१ )*
*१९५५: डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४ )*
*१९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९ )*
*१८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )*
*१७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७ )*

*_ २०२५ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_*    
*संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*
*मोबाईल: 9822695372*
*ईमेल: chavhansk65@gmail.com*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
भिंतीवर कॅलेंडर नाही असे घर शोधून सापडणार नाही. या कॅलेंडरचा वापर आपण कसा करतो ? किंवा करायला हवं ? याविषयी विचार जरूर वाचा 👇🏼
*हर कॅलेंडर कुछ कहता है ।*

..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार - शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार, पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांकडून इस्रोचं अभिनंदन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *जानेवारी महिन्यात 4 व 5 तारखेला 11 वा स्मिता पाटील आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुण्यात; जगभरातील प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांचे लघुपट पहाण्याची संधी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी, सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी, मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सूचना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *छ. संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचेही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले, हर्षकुमारकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *बीड खंडणीप्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण; पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*
📱9960358300
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 डॉ. सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड
👤 अनिकेत भारती, पोलीस अधिक्षक
👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका व कवयित्री, लातूर
👤 अशोक गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड
👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, धर्माबाद
👤 छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका, धर्माबाद
👤 धोंडिबा गंगाराम गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, धर्माबाद
👤 डॉ. शैलेश उमाटे, मनोविकारतज्ञ, मुंबई
👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद
👤 शेख बिस्मिल्ला सोनेशी, साहित्यिक, सिंदखेड
👤 दिलीप धामणे, शिक्षक तथा साहित्यिक, हिंगोली
👤 मुकुंद जोशी, शिक्षक, नांदेड
👤 राजेंद्र जयस्वाल, कुपटी, माहूर
👤 सतिश शिंदे, पत्रकर, धर्माबाद
👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका
👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड
👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड
👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*दासोपंत - दासोपंत दिगंबर देशपांडे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
हाताची पाचच बोटे हजारो कामे करतात , कारण त्यांच्यात ऐक्य असते.
*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे*
*ता. हदगाव जि. नांदेड*
📱9403046894
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) कोणत्या देशाने *बाल्ड ईगल* या पक्ष्याला *राष्ट्रीय पक्षी* म्हणून घोषित केले आहे ?
२) भारतात होणाऱ्या पहिल्या खोखो वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
३) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?
४) सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले 'बॉर्डर सोलर व्हीलेज' कोणते ?
५) भारतात पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली ?   

*उत्तरे :-* १) अमेरिका   २) सलमान खान   ३) दादाजी भुसे   ४) मसाली, जि. बनासकांठा, गुजरात   ५) वाराणसी
*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*
जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, 
ता. आमगाव, जि. गोंदिया 
 📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   🐜 *मुंग्या* 🐜
  ***************
एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्‍यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो.
साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात.
मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम.
जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥
केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥
ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥
समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥
नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥
        ।। संत नामदेव ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
  *🌷 आजची विचारधारा......🌷*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो.पण, अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेनाच्या सड्या एवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते.तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये.कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी  असतो.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
      *राजा आणि संत*

एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली. तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले," तू स्वतःला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही." दुसरा संत त्यावर म्हणाला," अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे." राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.
*तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.*
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

30 डिसेंबर 2024 सोमवार

27 डिसेंबर 2024 शुक्रवार

दिनांक 02 जानेवारी 2024 मंगळवार