दिनांक 02 जानेवारी 2024 मंगळवार
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 02 जानेवारी 2024
💠 वार - मंगळवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*_ या वर्षातील दुसरा दिवस आहे_*
••••••••••••••••••••••••••••••••
*_महत्त्वाच्या घटना:_*
••••••••••••••••••••••••••••••••
*२०००:संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.*
*२०००:पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.*
*१९९८:डॉ.सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट.पदवी प्रदान*
*१९८९:मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या*
*१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.*
*१९४५:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.*
*१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.*
*१९३६:मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना*
*१९०५:मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.*
*१८८५:पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.*
*१८८१:लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.*
*१७५७:प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.*
*_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••
*१९८४:माणिक प्रल्हादबुवा गिरी-- लेखक*
*१९८४:डॉ.चंदू हरी पवार -- कवी*
*१९८०:गजानन नत्थुजी कावडे-- कवी*
*१९७५:डॉ.देवेंद्र शेषराव तातोडे-- कवी लेखक*
*१९६४:नंदू सामंत -- कवी*
*१९६४:प्रा.राम कदम-- कथाकार*
*१९६२:प्रा.मधुकर बळीरामजी वडोदे -- लेखक,कवी*
*१९६०:रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९९८)*
*१९५९:किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि माजी खासदार*
*१९५७:उर्मिला देशपांडे-- कथा कादंबरी नाट्य लेखन*
*१९५६:प्रा.डॉ.दीपक गोपाळराव कासराळीकर-- समीक्षक*
*१९५०:प्रा.श्याम विद्याधरराव पाठक-- कवी, लेखक*
*१९४९:निरंजन कचरुजी पाटील -- लेखक, कवी,संपादक*
*१९३२:हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू:२० ऑगस्ट १९८५)*
*१९३१:दिगंबर तुकारामजी होले -- लेखक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक*
*१९२०:आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू:६ एप्रिल १९९२)*
*१९०१:महादेव मल्हार जोशी-- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(मृत्यू:१९७८)*
*१८९२:गणेश पांडुरंग परांजपे-- वैद्यकशास्त्र विषयक ग्रंथाचे कर्ते (मृत्यू:२६ फेब्रुवारी १९७३)*
*१८८६:बाळकृष्ण वामन सावर्डेकर-- लेखक (मृत्यू:१४ जानेवारी १९४६)*
*१८७६:भा.वा.भट--इतिहास अभ्यासक (मृत्यु:२७ डिसेंबर १९५२)*
*_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*
••••••••••••••••••••••••••••••••••••••
*२०२१:प्रा.डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे--प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ,संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र नागपूर,विदर्भ संशोधन महर्षी, जीवन साधना,विदर्भ भूषण पुरस्कारांनी सन्मानित (जन्म:७ सप्टेंबर १९३५)*
*२०१६:अर्धेन्दु भूषण वर्धन-- भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वतंत्र सेनानी(जन्म:२४ सप्टेंबर १९२४)*
*२०१३:डाॅ.विनय वाईकर-- गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक ,भूलतज्ज्ञ (जन्म:१९४१)*
*२००२:अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: १९४७)*
*१९९९:विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या*
*१९८९:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (जन्म:१२ एप्रिल १९५४)*
*१९८७:हरे कृष्ण महाताब --भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते,ओडिशाचे माजी मुख्यमंत्री(जन्म:२१ नोव्हेंबर १८९९)*
*१९४४:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म:२३ एप्रिल १८७३)*
*१९३५:मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक,टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते,वकील (जन्म:१९ ऑगस्ट १८८६)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_*
*✍ संकलन ✍*
*श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*
मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*कमवा आणि शिका हेच उपयोगी*
स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.........
..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे 12 जानेवारी रोजी PM मोदींच्या हस्ते उद्घाटन ? राज्य सरकारच्या हालचाली सुरू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने; दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण, AIIMS मध्ये कर्करोग रुग्णांसाठी खास उपचार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO च्या XSPECT ची अवकाशात भरारी; मोहिमेद्वारे कृष्णविवरांचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नव्या वर्षाचे स्वागत सुरु असतानाच जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *जीएसटीचे विक्रमी संकलन; 9 महिन्यात 15 लाख कोटींचा कर जमा, सरकारकडून आकडेवारी जाहीर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱9960358300
•••••••••••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
📙 *आजारानंतर केस का गळतात ?* 📙
"""""""""""""""""""""""""""""""""""""
केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने याद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटिन, मेलानिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, ई, प्रथिने, स्निग्धांश यामुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.
तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते ; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्याची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिअोरकाॅर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे वाढले तरी पटकन उपटले जातात.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे*
*ता. हदगाव जि. नांदेड*
📱9403046894
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीन येथे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ?
२) राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत कोणती यात्रा पूर्ण केली ?
३) जगातील सर्वात मोठे ध्यानकेंद्र कोठे आहे ?
४) भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी -२० शिखर परिषदेत कोणत्या देशाचा समावेश करून जी -२१ असा विस्तार करण्यात आला ?
५) देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळगाव कोणते ?
*उत्तरे :-* १) कॅप्टन शिवा चौहान, भारत २) भारत जोडो यात्रा ( ७ डिसेंबर २०२३ ते ३० जानेवारी २०२३ ) ३) वाराणसी ( स्वरवेद महामंदिर, २० हजार लोक एकत्र ध्यान करण्याची क्षमता ) ४) दक्षिण आफ्रिका ५) पापळ, अमरावती
*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*
जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,
ता. आमगाव, जि. गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद
👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद
👤 कविता जोशी, शिक्षिका
👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती
👤 महेंद्रकुमार पद्मावार
👤 मोगरे शंकर
👤 श्रीकांत काटेलवार
👤 आनंदराव धोंड
👤 रवी खांडरे
👤 अक्षय घाटे
👤 सचिन कौटवाड
👤 संजय पांचाळ
👤 संजय फडसे
👤 महेंद्रकुमार पद्मावार
👤 प्रदीप ढगे
👤 नरसिंग पेंटम
👤 शहाजी पालवे
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
बहूतांपरी कुसरी तत्त्वझाडा।
परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥
मना सार साचार ते वेगळे रे।
समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥
सरळ अर्थ - किती तरी गोष्टींविषयी अहमहमिकेने, अलंकारिक भाषेमध्ये बोलता येत असले तरी त्यातले सार काय आहे त्याचा आपल्याला मनात निश्चय झालेला असला पाहिजे. असे हे जे निश्चित झालेले सारतत्व असते ते इतर सगळ्या गोष्टींहून आगळेवेगळेच असते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🕊🌎 ‼ *विचारधारा*‼
🕊🌎
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
जेथून स्वत:च्या ऐवजी इतरांचे भले होत असेल आणि मनाला समाधान मिळत असेल तर असे एखादे चांगले कार्य करण्याचा एकतरी संकल्प करावे. व आपल्यात असलेले वाईट विचार, वाईट सवयी, व्यर्थ गोष्टीचा त्याग करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले कार्य कधीच वाईट नसतात तर उशीरा का होईना शेवटी त्याच्यामुळे सर्व चांगलेच झालेले बघायला मिळत असते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*शासन*
महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.
तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.
लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.
स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें